आज महात्मा जोतिराव फुले यांची जयंती असुन आजच्याच दिवशी महाराष्ट्रच्या मातीला अभिमान वाटावा असे महान व्यक्तीमत्व जन्माला आले होते. संपुर्ण मानवजातीला गुलामगिरीतुन मुक्त होण्यासाठी प्रयत्न करणारे महात्मा फुले हे व्यक्तीमत्व होते. साखळदंड म्हणजे काय हे त्यालाच समजतं ज्याच्या पायात वर्षानुवर्षे गुलामगिरीचा साखळदंड असतो, साखळदंड त्यालाही समजतो ज्याच्या पायात जातीपातीचे साखळदंड अनेक वर्षांपासून आहे आणि हेच गुलामगिरीचे साखळदंड तोडण्याचे काम महात्मा फुले यांनी केले. मानवी हक्कावर इ.स.१७९१ मध्ये थॉमस पेन यांनी लिहिलेले पुस्तक त्यांच्या वाचनात आले आणि त्याचा प्रभाव त्यांच्या मनावर इत का झाला की सामाजिक न्यायाबाबत त्यांच्या मनात विचार येऊ लागले, त्यासाठी त्यांनी लगेचच काम सुरू केले. त्यामुळे च विषमता दूर करण्यासाठी स्त्रीशिक्षण आणि मागासलेल्या जातीतील मुलामुलींचे शिक्षण यावर त्यांनी भर देण्याचे ठरवले, सामाजिक गुलामगिरीतुन मुक्त 3e भेदभाव यामुळे कमी होईल असे त्यांचे निश्चित मत आणि अनुमान होते. कोणताही धर्म ईश्वराने निर्माण केलेला नाही आणि चातुर्वण्य व जातिभेद ही निर्मिती मानवाचीच आहे' असे रोखठोकपणे बोलताना मात्र या विश्वाची निर्मिती करणारी कोणती तरी शक्ती आहे अशी त्यांची विचारसरणी होती. मानवाने गुण्यागोविंदाने रहावे असे त्यांचे परखड विविर होते. त्यांनी लिहिलेल्या शेतकऱ्याचा असूड' या पुस्तकातून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची विदारक दुर्दशा आणि दारिद्र्याची वास्तवता विशद केली आहे. या पुस्तकाद्वारे विशाल दृष्टिकोनाचा क्रांतिकारक म्हणूनही जोतीरावांचे दर्शन होते. 'नीती हाच मानवी जीवनाचा मुख्य आधार आहे' हा विचार मांडणारे जोतीराव एक तत्त्वचिंतक व्यक्तिमत्त्व होते. महात्मा फुलेंनी सामाजिक प्रबोधन करण्यासाठी शेतकऱ्यांचा आसूड हा ग्रंथ लिह न सामाजिक प्रबोधन करण्याचे काम केलं, जोतीराव गोविंदराव फुले महात्मा फुले नावाने प्रसिद्ध, हे मराठी लेखक, विचारवंत आणि समाजसुधारक होते, त्यांनी सत्यशोधक समाज नावाची संस्था स्थापन केली; शेतकरी आणि बह जन समाजांच्या समस्यांना केंद्रस्थानी ठेवून पुरोगामी विचारांची मांडणी केली आणि महाराष्ट्रातील स्त्री शिक्षणाचा पाया घातला, जनतेने त्यांना महात्मा ही उपाधी बहाल केली होती. ही पदवी त्यांना इ.स.१८८८ या साली मिळाली, 'शेतकऱ्यांचे आसूड' हा ग्रंथ महात्मा फुले यांनी लिहिला होता, जोतिबा फुले यांचे मूळ गाव सातारा जिल्ह्यातील कटगुण हे होते, त्याच गावी महात्मा फुल्यांचा जन्म ११ एप्रिल १८२७ रोजी झाला, जोतिबांच्या वडिलांचे नाव गोविंदराव आणि आईचे नाव चिमणाबाई होते, शेवटच्या पेशव्यांच्या काळात महात्मा फुले यांचे वडील आणि दोन चुलते फुले पुरवण्याचे काम महात्मा जोतिबा करीत होते, त्यामुळे गो-हे हे त्यांचे मूळ आडनाव असले तरी, पुढे ते फुले म्हणून ओळखले जाऊ लागले व तेच नाव पुढे रूढ झाले, कटगुणहून त्यांचा परिवार पुरंदर तालुक्यातील खानवडी येथे आला. तेथे त्यांचे घर असून, त्यांच्या नावे ___ सात बाराचा उतारा आहे . ___ खानवडी येथे फुले आडनावाची बरीच कुटुंबे आहेत. जोतीराव केवळ नऊ महिन्यांचे होते, तेव्हा त्यांच्या आईचे निधन झाले, त्यांचा विवाह वयाच्या तेराव्या वर्षी सावित्रीबाई यांच्याशी झाला, प्राथमिक शिक्षणानंतर काही काळ त्यांनी भाजी विक्रीचा व्यवसाय केला, इ.स. १८४२ मध्ये माध्यमिक शिक्षणासाठी पुण्याच्या स्कॉटिश मिशन हायस्कूलमध्ये त्यांनी प्रवेश घेतला. बुद्धी अतिशय तल्लख , त्यामुळे पाच-सहा वर्षातच त्यांनी अभ्यासक्रम पूर्ण केला, महात्मा फुले यांच्या शिक्षणाचे महत्त्व पटवून देणाऱ्या खालील ओळी प्रसिद्ध आहेत:विद्येविना मती गेली। मतीविना नीती गेली । नीतीविना गती गेली । गतीविना वित्त गेले । वित्ताविना शद्र खचले। इतके जोतिबा फुले अनर्थ एका अविद्ये ने के ले बहुजन समाजाचे अज्ञान, दारिद्रय आणि समाजातील जातिभेद पाहून त्यांनी ही सामाजिक परिस्थिती सुधारण्याचा निश्चय केला. त्यांनी १८४८ साली पुण्यामध्ये भिडे यांच्या वाड्यात पहिली मुलींची शाळा काढून तेथील शिक्षिकेची जबाबदारी सावित्रीबाई फुलेंवर सोपविली. महाराष्ट्रातील स्त्रीशिक्षणाची चळवळ महात्मा फुले यांनी सुरू केली. तसेच अस्पृश्य मुलांसाठी त्यांनी पुण्याच्या वेताळ पेठेत इ.स.१८५२ मध्ये शाळा स्थापन केली. त्यांच्या या कार्याला विरोध होत होता, पण जोतीराव आपल्या भूमिकेवर ठाम असत. जोतीरावांनी पत्नी सावित्रीबाईंना शिक्षण देऊ न शिक्षण कार्यास प्रवृत्त के ले . शाळेच्या मुख्याध्यापक पदी आरूढ झालेली भारतातील पहिली महिला म्हणजे सावित्रीबाई फुले याच होत्या, सावित्रीबाई फुले यांनी जोतिराव फुलेंच्या खांद्याला खांदा लावून काम केले, त्याचप्रमाणे स्वतंत्रपणे फक्त स्त्रियांसाठी शाळा काढणारे महात्मा फुले हे पहिले भारतीय होते, अशा या महान व्यक्तीमत्वास जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन
गुलामगिरीतुन मुक्त करणारे - महात्मा जोतिबा फुले 3e